सहकार शिरोमणी प्रशासनावर आमचा विश्वास : संघटनांनी आंदोलन करू नये

सहकार शिरोमणी कामगार संघटनेचे प्रांताधिकारी यांना निवेदन


पंढरपूर : ईगल आय मीडिया

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे कामगार संघटनेचा कारखान्याचे संस्थेवर व संचालक मंडळावर पुर्ण विश्वास असून देणीदेण्यासाठी कटीबध्द आहेत. संघटनांनी राजकारण करण्यापेक्षा कारखान्याचे चेअरमन व प्रशासन एकत्रित बसून तोडगा काढावा अन्यथा आदोलनामुळे कारखान्यावर अवलंबुन असणारे हजारो कुटुंब, सभासद, तोडणी वाहतुक कंत्राटदार यांच्या चुली बंद पडतील असे निवेदन प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसिलदार वौशाली वाघमारे यांना सर्व कामगारांच्यावतीने देण्यात आले. यावेळी दिलीप काळे बंडू पवार बाबासो पिसे माउली कुंभार प्रविण लिकर पांडूरंग बोंगे-उपस्थित होते.


1998-1999 मध्ये स्व.वसंतराव (दादा) काळे यांनी साखर कारखान्याची निर्मिती करुन प्रथम चाचणी गळीत हंगाम सुरु केला. 1998 ते 2016-17 पर्यंत कारखान्याचे कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने वेळेवरती पगार, पगारवाढ, बोनस,महागाई भत्ता व जादा कामाचा भत्ता इत्यादी सर्व सुख सोयी दिलेल्या आहेत.
हंगाम 2019-20 ऊसा अभावी कारखाना बंद ठेवावा लागला. त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे आम्हाला पगार व इतर सुविध मिळणेस विलंब झालेला आहे. यामध्ये चेअरमन व कारखाना व्यवस्थापन यांचा काहीही दोष नाही.

यंदाच्या हंगामासाठी कामगारांनी मशिनरी दुरुस्ती देखभालीची कामे पुर्ण केलेली आहेत. कारखान्याचे सभासद,कामगार,व वाहन मालक यांच्या दृष्टीने हंगाम 2020-21 मध्ये कारखाना सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कामगारांची देणी देण्यास कारखाना व्यवस्थापन कटीबध्द असताना काही राजकीय संघटनानी कारखाना कामगारांना भडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्हा कामगारांचा कारखाना व्यवस्थापनावर पुर्ण विश्वास असून कामगार पगारीबाबतीत इतर संघटनांनी हस्तक्षेप करु नये, असे आवाहन कामगार संघटनेने केले आहे.


सध्या काही संघटना कार्यकर्त्यानी आमच्या कारखान्याचे सभासद, तोडणी वाहतुक कंत्राटदार व कामगार यांचे देय रक्कमेबाबत जे आंदोलन चालु आहे. यामुळे कारखान्याची बदनामी होवून कारखान्यासाठी कर्ज पुरवठा करणाज्या बँकांकडून अर्थ सहाय्य होण्यास अडचणी निर्माण होतील. कारखाना निधी अभावी बंद राहिल्यास कारखान्यावर अवलंबून असणारे सभासद, तोडणी वाहतुकदार, कामगार व इतर घटक अशा हजारोंच्या कुटुंबाच्या चुली बंद पडतील व त्याचा कारखान्यावर कायमस्वरुपी विपरीत परिणाम होणार आहे. तरी संघटना कार्यकर्त्यानी व आंदोलकांनी वरील बाबींचा विचार करुन,आपण आंदोलन मागे घेवून आम्हा कामगारास सहकार्य केल्यास कारखान्यास बँकांकडून कर्ज पुरवठा होवून 2020-21 सुरु करणेसाठी मदत होणार असेेही या निवेेेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!