शनिवारी कोरोना बाधितांची संख्या वाढली

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात शनिवारी दिवसभरात ४ हजार २५९ नवे करोनाबाधित आढळले, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय ३ हजार ९४९ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ७६ हजार ६९९ वर पोहचली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्के आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.

सध्या राज्यात ७३ हजार ५४२ केसेस असून, १७ लाख ५३ हजार ९२२ जण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत राज्यात ४८ हजार १३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ नमुन्यांपैकी १८ लाख ७६ हजार ६९९(१६.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

error: Content is protected !!