दिलासा : कोरोना रुग्ण संख्या घटली

टीम : ईगल आय मीडिया

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाला असून आज २४ तासांत राज्यात २४ हजार ६४५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३० हजार ५३५ इतकी होती. कालच्या तुलनेत ही घट ५ हजार ८९० ने कमी आहे. राज्यात कालच्या तुलनेने नव्या रुग्णांची संख्या थोडीशी घटली आहे.

या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण १९, हजार ४६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ११ हजार ३१४ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख १५ हजार २४१ वर जाऊन पोहचली आहे.

आज राज्यात एकूण ५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ९९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१३ टक्के इतका आहे. राज्यात आज १९ हजार ४६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २२ लाख ३४ हजार ३३० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२२ टक्क्यांवर आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!