भीषण अपघात : 12 ठार

टीम : ईगल आय मीडिया

भरधाव वेगाने आलेल्या टँकर ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 12 जण ठार झाले आहेत. आज सकाळी राजस्थान मधील नागौर जिल्ह्यातील श्री बालाजी जवळ हा अपघात झाला आहे. 8 जणांचा जागीच मृत्यू, 4 जणांचा वाटेतच मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, समोरून वेगाने येणाऱ्या ट्रेलरने जीपला धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जणांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.

मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन जिल्ह्यातील घाटिया पोलीस ठाण्याच्या सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी क्रुजर जीप मधून राजस्थान मध्ये देवदर्शनासाठी गेले होते. रामदेवराला भेट दिल्यानंतर करणी मातेचे दर्शन घेत घरी परतत होते. दरम्यान, नागौरहून नोखाकडे जाणाऱ्या ट्रेलरने या गाडीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील श्री बालाजीजवळ भीषण अपघात झाल्याची घडना घडली आहे.

दरम्यान, अनेक लोक अपघातग्रस्त गाडीमध्ये अडकले होते. अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक लोकांच्या मदतीने गाडीतील मृतकांना बाहेर काढण्यात आले

Leave a Reply

error: Content is protected !!