गेवराई जवळ भीषण अपघात : 5 जण ठार

मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष भिंगे यांचा समावेश

टीम : ईगल आय मीडिया औरंगाबाद-बीड महामार्गावर गेवराई जवळ झालेल्या भीषण अपघातात वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह 5 कार्यकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेवराई बायपासजवळ कार ऑईल घेऊन जाणाऱ्या टँकरवर जाऊन धडकली.

 दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फेसबुकवरून दु:ख व्यक्त करत मयतांना श्रध्दांजली वाहिली आहे

हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे समजते. मृतांमध्ये सदाशिव भिंगे, संतोष भिंगे, महादेव सकटे, सुभाष भिंगे, राम भिंगे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे हे आपल्या कार्यकरत्यासह औरंगाबादला कामानिमित्त कार (क्रं.एम.एच.46 बी.9700) मधून जात होते. गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठिमागे असलेल्या बायपास रोडवर कार येताच, कारचालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता ओलांडून समोरून येत असलेल्या इंडीयन ऑईलच्या कंन्टेनर (क्रं.जी.जे.16, ए.यू.2475) ला धडकली. टँकरला धडकल्यानंतर कारचा अक्षरश: चुराडा झाला.

Leave a Reply

error: Content is protected !!