टीम : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोना कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे नवे आदेश या पाच तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आहेत.
त्यानुसार 5 तालुक्यातील अत्यावश्यक सेवा संध्याकाळी चार पर्यंत सुरू राहणार, बिगर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद राहणार बागेत. मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्ण पणे बंदी असून विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी
अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.