राज्यात कोरोनाचे रुग्ण आज पुन्हा वाढले

टीम : ईगल आय मीडिया

सोमवारी नवीन कोरोना बाधितांची संख्या रविवारच्या तुलनेत घटल्या नंतर मिळालेला दिलासा 24 तासात संपुष्टात आला असून आज मंगळवारच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण २८ हजार ६९९ नव्या करोनाबाधितांची भर देखील पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा आता २५ लाख ३३ हजार ०२६ इतका झाला आहे. दिवसभरात एकूण १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुसरीकडेत्यापैकी २ लाख ३० हजार ६४१ रुग्ण आहेत. तर करोनामुळे राज्यात आजपर्यंत ५३ हजार ५८९ मृत्यू झाले आहेत.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा कसा घालायचा या प्रश्नावर राज्य सरकार आणि प्रशासन उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असताना राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब सरकारी आकडेवारीवरून समोर आली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

मुंबईतल्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ३ हजार ५१२ नवे करोनाबाधित सापडले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून रिकव्हरी रेट आता ९० टक्क्यापर्यंत आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने देखील यंदा होळी आणि धुलिवंदन हे उत्सव खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर बंदी घातली आहे. राज्य सरकारने नुकतीच करोनासंदर्भात नवी नियमावली जारी केली असून त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, कार्यालये या ठिकाणी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षक किंवा कर्मचाऱ्यांना परवानगी असेल, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अनेक वेळा नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!