आमदार भारत भालके यांच्या निधनाने जनतेच्या हाकेला धावून जाणारा लोकनेता हरपला
मुंबई : ईगल आय मीडिया
पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने अत्यंत मनमिळाऊ;जनसामन्यांच्या हाकेला धावून जाणारा कर्तृत्ववान लोकनेता आणि आमचा जवळचा मित्र हरपला आहे.अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
आमदार भारत भालके तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले.पंढरपूर मंगळवेढा भागाचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना निवडणुकीत जायंट किलर म्हणून ओळखले जात होते. पंढरपूर च्या राजकीय सामाजिक वर्तुळात रांगडा राजकीय पैलवान म्हणून लोकप्रिय होते.
त्यांचे आंबेडकरी चळवळीशी मित्रत्वाचे नाते होते. आमच्या शी त्यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते.त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नुकसान झाले नाही तर आमचेही वैयक्तिक मोठे नुकसान झाले आहे, अशी शोकभावना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.