महाड दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत 36 जनांचा मृत्यू

पोलादपूर तालुक्यातील 2 गावात भूस्खलन : 11 जण ठार

टीम : ईगल आय मीडिया

महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर तलीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 36 जनांचा मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत 30 घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण 80 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील दोन गावात भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घनांमध्ये 11 जनांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे.

संबंधित बातमी वाचा


इतके तास होऊनही राज्य सरकारला या दुर्घटनेचा थांगपत्ताही नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपच्या काही आमदारांसह तळीये गावात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, असा सतांप तळीये गावातून प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला. प्रवीण दरेकर, भाजप आमदार गिरीश महाजन हे या गावात आहेत.

रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 किलोिमटवर तलीये गावात एक दरड कोसळल्याच्या घटनेत तब्बल 30 घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण 80 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेली होती. ययापैकी 36 लोक मयत झाल्याचे सांगितले जाते तर जवळपास 40 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहे. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 61 वर गेला आहे.

प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 80 लोक दबले गेल्याची माहिती ग्रामस्थांनी केली आहे. आतापर्यंत 36 जणांचे मृतदेह हाती लागले आहे. मात्र इतकं निर्लज्ज सरकार, प्रशासन आहे की त्यांना या घटनेची माहितीच नाही. काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली तरी अजून मदत मिळू शकलेली नाही.

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली.

स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 36 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!