अलमट्टी धरणसंदर्भात बेंगलोर येथे बैठक

कर्नाटक चे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि महाराष्ट्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात चर्चा

बेंगळुरू : मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची पत्रकार परिषद

टीम : ईगल आय मीडिया

पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगळूरु येथे भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पुराचे नियंत्रण कशापद्धतीने करता येईल आणि त्यात कोणत्या पद्धतीने दोन्ही राज्यांनी समन्वय साधायचा यावर चर्चा झाली.

एकंदर येणारा अलमट्टी धरणातील प्रवाह आणि पुढे जाणारा प्रवाह व महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर आपण प्रभावीपणे जर नियंत्रण ठेवले तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती पातळी ठेवायची खास करुन अलमट्टी धरणाच्या पाण्यावर चांगलं नियंत्रण कसं ठेवता येईल, अशा पद्धतीची चर्चा झाल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. ही बैठक दोन्ही राज्यात योग्य समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा ॲक्विझिशन सिस्टीम (जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळवण्याबाबतची यंत्रणा) बसवली आहे, मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनॅमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल.


२०१९ चा पूर लक्षात घेता, गेल्या वर्षी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनात अचूक नियोजन झाले होते. यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पुराचा तडाखा बसू नये यासाठी आहोत. आजची भेटही पूर नियंत्रणाच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

Leave a Reply

error: Content is protected !!