नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू

मोहोळ तालुक्यात भीमा काठच्या पूरग्रस्त भागात आ. प्रणिती शिंदे यांचा पाहणी दौरा

मोहोळ : ईगल आय मीडिया
मोहोळ तालुक्यातील भिमा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे पुराच्या पाण्याने ज्या तीव्रतेन नुकसान झाले आहे, त्याच तीव्रतेने शासनाने त्यांचे पंचनामे करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले.


मोहोळ तालुक्यातील भीमा नदी काठावरील घोडेश्वर, अरबळी, मीरी या गावात भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोंडाला आलेली संपूर्ण पिके तर वाया गेलीच, शिवाय शेतातील माती देखील पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे. तर पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे पिकासह घरातील सर्व वस्तू वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळ काही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी गुरुवारी या भागात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

या भागातील डाळिंब, द्राक्ष, केळी बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. पूर्ण वाढ झालेल्या ऊसाच्या पिकात अद्यापर्यंत पाणी असल्यामुळे पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फळबागांच्या झालेल्या नुकसानाच्या नोंदी व्यवस्थितपणे घेण्याच्या तर पडलेले विजेचे पोल, बंद पडलेले डीपी, खंडीत असलेला वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष राजेश पवार, सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, मोहोळ तालुका अध्यक्ष अशोक देशमुख, जिल्हा सरचिटणीस रफिक पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम चव्हाण, सुलेमान तांबोळी ,तालुका युवक अध्यक्ष आरिफ पठाण, तालुका सरचिटणीस संतोष शिंदे, हरिभाऊ काकडे, बसवंत पुजारी, युवा उपाध्यक्ष महादेव सुरवसे, लक्ष्मण माने, बालाजी लोहकरे, बेगमपूरचे तलाठी गणेश साठे ग्रामसेवक हरी पवार व तसेच बेगमपूर, अरबळी,मिरी या गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

error: Content is protected !!