माझी वंसुधरा अभियान प्रभावीपणणे राबवा !

नाही तर माझेशी गाठ..! सोलापूर झेड पी चे सिईओ स्वामी यांचा ईशारा


सोलापूर : ईगल आय मीडिया

माझी वसुंधरा अभियान प्रभावी पणे राबवा. १७ ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे योजना राबविली नाही तर माझेशी गाठ आहे, असा सज्जड इशाराच आज सिईओ दिलीप स्वामी यांनी दिला.


सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पंचायत यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशीधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी डी शेलार, उत्तर सोलापूर चा गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.


सोलापूर जिल्हयात माझी वसुंधरा, हे अभियंता १७ ग्रामपंचायती मध्ये प्रभावी पणे राबवा, या गावात सर्व योजनांचे अभिसरण करणेत यावे अशी सुुुचना करून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापनाची कामे करणेत येणार आहेत, अभ्यागता साठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा देणेत येणार आहेत. गाव हिरवेगार करा. झाडांना ठिबक सिंचन करा असेेेही स्व्वा्मी यावेेळी म्हनाले.

जिल्हा स्तरावर समिती – शेळकंदे

जिल्हा स्तरावर माझी वसुंधरा अभियाना बाबत जिल्हा स्तरीय समिती गठीत करणेत आली असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले. कामात हालगर्जीपण चालणार नसल्याचे शेळकंदे यांनी सांगितले.

माझी वसुंधरा अभियानात झाडे लावा, शाळा स्वच्छ सुंदर करा. अंगणवाडी मध्ये पोषण आहार सप्ताह राबवा, तुम्ही सर्वजण या जिल्ह्यातील आहात, येथेच नोकरी करीत आहात. या भुमीत काम करीत असताना आपण चांगल्या सुविधा द्या. या ग्रामपंचायती गुणांकनामध्ये कमी पडलेस सरपंचासह विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना जबाबदार धरणार असल्याचे सिईओ स्वामी यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!