पंढरपूर – अनवली बायपास मार्गावरील टोल नाका बंद

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर – टाकळी – कासेगाव – अनवली या बायपास मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन धारकांना दिलासा मिळाला असून आजपासून या मार्गावरील टोल वसुली बंद झालेली आहे.

पंढरपूर-टाकळी-कासेगाव-अनवली ( जिल्हा मार्ग 76 ) हा बीओटी मधून अशोक ब्रिजवेज ने तयार केला होता. त्यामुळे गेल्या सुमारे 15 वर्षांपासून या मार्गावर अशोका ब्रिजवेज ही कंपनी टोल वसूल करीत होती. 4 वर्षांपूर्वी राज्यातील अनेक टोल बंद झाले तरीपण या मार्गावरील टोल वसुली कंपनीने न्यायालयात जाऊन सुरूच ठेवली होती.

अखेरीस 15 जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्या नंतर टोल वसुली बंद करण्यात आली आहे. आज दिनांक 15 ऑगस्ट पासून या मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना टोल भरावा लागणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.

हा टोल बंद झाल्याने वाहनधारकांना विशेषतः ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!