पंढरपूर पोटनिवडणूक 19 उमेदवार रिंगणात !

सिद्धेश्वर अवताडे निवडणूक रिंगणात कायम : नागेश भोसले, माऊली हळनवर यांचे अर्ज माघारी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकिसाठी आज 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर सिद्धेश्वर अवताडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने भाजपला धक्का बसला आहे. तर माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माऊली हळनवर यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

पंढरपूर पोटनिवडणूकिसाठी 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत 8 अर्ज अवैध ठरले होते. वैध 30 अर्जापैकी 11जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. तर 19 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिद्धेश्वर अवताडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. तर अपक्ष शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचे अर्ज राष्ट्रवादी चे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत.

पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे 19 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.

उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये महेंद्र काशिनाथ जाधव (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), नागेश आण्णासो भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर(अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष),संजय चरणु पाटील (अपक्ष),अमोल अभिमन्यु माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे(अपक्ष), रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

एकूणच उमेदवार अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून राष्ट्रवादी चे भगीरथ भालके, भाजपचे समाधान अवताडे, अपक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. तर स्वाभिमानीचे सचिन पाटील, अपक्ष शैला गोडसे यांना किती मते पडतात यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!