उपरीतील अतिक्रमण विरोधात रिपाइंचे आमरण उपोषण सुरू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उपरी ( ता.पंढरपूर) येथील दलित वस्ती स्मशानभूमीजवळ असलेल्या गायरान जमिनीवर गावातील काही समाजकंटकांनी अतिक्रमण केल्यामुळे दलित समाजाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत 2013 सालापासून शासनाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने देऊन याबाबत आजतागायत विचार होत नाही. त्यामुळे आरपीआय आठवले गटाच्यावतीने व आघाडी प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांचे नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनास उपरी गावचे शाखाप्रमुख दत्ता वाघमारे, अनिल सोनवणे आदी ग्रामस्थ तहसीलसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.
उपरी येथील गट नंबर 447 मधील दोन हेक्टर बहात्तर आर (७ एकर ) हि गायरान शेतजमीन दलित समाज व मुस्लीम समाजाची दफनभूमी असून गावातील काही समाजकंटकांनी या जागेवर अतिक्रमण करून गेली वीस वर्षे बागायत शेती करून उत्पादन घेत आहेत. वारंवार दुःखद घटनेची समाजातील लोकांना वेठीस धरून त्यांना त्रास व हाल सहन करावे लागत आहे. यातून मुक्ती मिळावी म्हणून मंगळवार पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार यावेळी दीपक चंदनशिवे यांनी यावेळी बोलून दाखवला.

Leave a Reply

error: Content is protected !!