कंगनाला नुकसानभरपाई द्या !

मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यपालाना भेटले

मुंबई : ईगल आय मीडिया

मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर 24 तासाची नोटीस देऊन तडक कारवाई केली आहे, त्यामुळे त्यांनी नियमाचे उल्लंघन करून कंगणावर पालिकेने अन्याय केला आहे. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणावतला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे केली आहे.

तसेच ज्या अधिकाऱ्यांनी कंगना च्या कार्यालयावर तोडक कारवाई केली त्यांच्यावर कारवाई करून तिला न्याय मिळवून दिला पाहिजे अशी मागणी करीत, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांना विनंती केली आहे.

कोरोनाला रोखण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारने कोरोना साठी कठोर पावले उचलावी असे आदेश महामहिम भगतसिंग कोष्यरी यांनी राज्य सरकार ला द्यावेत यासाठी निवेदन दिले आहे.
कॅप्टन दीपक साठे यांचा कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले होते त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र् भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!