सातारा,रायगड जिल्ह्यातील 1 हजार पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पूरग्रस्तांना अभिजीत पाटील यांचा मदतीचा हात

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सातारा, रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 1 हजार कुटुंबांना dvp उद्योग समूहाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत आज पाठवण्यात आली. Dvp चे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या हस्ते मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांचे पूजन करून निरोप देण्यात आला.

वाढदिवसानिमित्त या कीटमध्ये गहू, साखर, तांदूळ, डाळ, तेल, रवा, मसाला, तिखट, मीठ बॉटल, चहा पावडर, बिस्कीट पुडे, ब्रश, कोलगेट, साबण, मेणबत्ती यासह २१ जीवनावश्यक वस्तूंचे कीट सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात बाजे, मिरगाव, गोकुळ, ढोकावळे तर रायगड जिल्ह्यातील असनपोई, बौद्धवाडी, बिरवडी, भोरप या पूरग्रस्त गावातील नागरिकांना देण्यासाठी अभिजीत आबा पाटील  फाऊंडेशन चे सहकारी रवाना झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने थैमान घातल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याने हजारो लोकांची घरं पाण्याखाली गेली. शेकडो जनावरं वाहून गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळून अनेकांचा बळी गेले. ज्यांच्या घरातील माणसं दगावली त्यांच्यावर तर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. या संकटाच्या प्रसंगात या पूरग्रस्तांना “एक हात मदतीचा” देण्याच्या हेतूने dvp उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबविण्यात आला.

अभिजीत  आबा पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या अवाहनाला प्रत्येकाला जमेल तशी वस्तू ,अन्न धान्याची मदत केली. आपल्याकडं किती आहे यांचा विचार न करता सहका-यांनी केलेली ही मदत मनाला खूपच भावली. मला वाटतं घासातला घास काढून देणारी माणसांसोबत काम करताना मला ऊर्जा मिळत असून त्यांची ही दानत पाहून अधिक काम करण्याची प्रेरणाही मिळाली. याच माणसांच्या बळावर आपण कोणत्याही संकटाला धाडसाने सामोरं जाऊ शकतो असं अभिजीत  पाटील यांनी मत व्यक्त केले.

Leave a Reply

error: Content is protected !!