शेळवे येथील शेतीचे पंचनामे अजुनही रखडलेले !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शेळवे ( ता.पंढरपूर ) येथील शेतीचे पंचनामे अजुनही झालेले नाहीत.भिमा नदीला आलेल्या महापुरामुळे व कासाळ ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे तसेच अतिवष्टीमुळे शेळवे परिसरातील संपुर्ण शेती ऊद्धवस्त झालेली आहे. शेळवे येथील भिमा नदीचा महापुर ओसरुन आठ ते दहा दिवस झालेले आहेत, परंतु शेळवे येथील शेतीचे पंचनामे करण्यासाठी एकही अधिकारी फिरकलेला नाही.

शासनाकडुन जाहीर केलेली नुकसान भरपाईमध्ये पावसाने व महापुराने झालेली पिकांची नासाडी शेतातून बाहेर काढायलाही एवढे पुरत नसल्याचेही शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.

भिमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतातील पिकांची झालेली नासाडी बाहेर काढावी तर पंचनामे झालेले नाहीत,तर शेतीची मशागत करावी तर पुन्हा पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पुरावा काय दाखवायचा अशा द्विधा अवस्थेत शेळवे येथील शेतकरी सापडलेला आहे. पुरामुळे शेळवे परिसरातील संपुर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरातील ऊस ,केळी,मका,द्राक्षे,डाळिंब ,आंबा ,पेरु व चिंच या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

शेळवे येथील संबधीत अधिकारी सांगतात कि, मला दुसरे गाव दिलेले आहे.मी त्याच गावात पंचनामे करत आहे. त्यामुळे आपल्या गावात कधी पंच8 होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!