जिल्हात दहा हजार शोषखड्डयाना प्रारंभ : सिईओ स्वामी

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य : मंद्रुप मधून अभियानास सुरूवात

सोलापूर : ईगल आय मीडिया

कोरोना अद्यापही गेलेला नाही, शाळां सुरू झालेनंतर विद्यार्थ्यांची काळजी घ्या. सोलापूर जिल्ह्यात १० हजार शौषखड्डे घेण्यासाठी अभियानास प्रारंभ करणेत आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. सोरेगाव व मंद्रुप (ता.उ.सोलापूर ) येथे २ आॅक्टोबंर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तर सोलापूर पंचायत समिती अंतर्गत सोरेगाव येथील स्वच्छ व सुंदर शाळेस भेट दिली. त्या नंतर सोरेगाव व मंद्रुप येथील लोकसेवा विद्यालयात सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी च्या निबंध स्पर्धेत पाहणी केली. मंद्रुप येथील केंद्र अंतर्गत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.


या वेळा दक्षिण सोलापूर च्या पालक अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, गटविकास अधिकारी राहुल देसाई, उत्तर सोलापूर चे गटविकास अधिकारी डाॅ. प्रशांत देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गटशिक्षणाधिकारी बनसोडे, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, मुख्याध्यापक रणजित गरड, केंद्रप्रमुख सिद्धाराम वाघमोडे, शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, गटशिक्षणाधिकारी बापू जमादार, मंद्रुप चा सरपंच कलावती खंदारे , मुख्याध्यापक टेळे प्रमुख उपस्थित होते.

शाळा सुरू झालेनंतर , विद्यार्थ्याची काळजी घ्या : सिईओ
कोरोना गेला नाही. शाळां सुरू झालेनंतर विद्यार्थ्यांची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना साबणाने स्वच्छ हात धुणेची व्यवस्था करा. असे आवाहन सिईओ स्वामी यांनी केले. या प्रसंगी शिक्षक सतीश वाले व कविता दिवाणजी यांनी मनोगत व्यक्त केले.


महात्मा गांधी जयंती निमित्त मंद्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित स्थायित्व व सुजलाम अभियान व स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षण २०२१ चा गाव स्तरावरील शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. या प्रसंगी सांडपाणी व्यवस्थापना साठी शोषखड्डेचा शुभारंभ करणेत आला. जिल्हयात १० हजार शौषखड्डे सुरू करणेत आले असल्याचे सिईओ स्वामी यांनी सांगितले.


इंदिरा नगर येथील स्वच्छ व सुंदर असलेल्या प्राथमिक शाळेस भेट दिली. अस्थिव्यग असलेले यशवंत कांबळे या मुख्याध्यपकांनी परिश्रम करून शाळेचे रूपडे पालटले आहे. या शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापक कांबळे यांचा जागेवर जाऊन सिईओ स्वामी यांनी सत्कार केला.

जिल्ह्यात निबंध स्पर्धेत ६ हजार शिक्षकांचा सहभाग !
सोलापूर जिल्हयात प्राथमिक शिक्षकांसाठी ठेवणेत आलेल्या निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 6848 पैकी 6368 शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. केंद्र स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. लोहार यांनी सांगितले.

माझी वसुंधरा अभियाना अतंर्गत मंद्रुप मधील इंदिरा नगर शाळेत वृक्षरोपन करणेत आले. एक पद एक वृक्ष लागवड व सांडपाणी व धनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामांची पाहणी सिईओ स्वामी यांनी केली. नवीन बांधलेल्या शौषखड्डयाची पाहणी केली.

Leave a Reply

error: Content is protected !!