स्वेरीच्या आठ विद्यार्थ्यांची ‘टेक महिंद्रा’ या कंपनीत कॅम्पस द्वारे निवड


फोटो ‘टेक महिंद्रा’ या कंपनीत निवड झालेले विद्यार्थी अनुक्रमे विठ्ठल शिरसाळे, रूपम मुळूक, वैष्णवी  वाळके, वेदांगी भुजंग, ऋषिकेश लोहार, भूषण देशमुख, राहुल हिंगमिरे व स्वप्निल उबाळे.


प्रतिनिधी : ईगल आय न्यूज

  पंढरपूर ‘टेक महिंद्रा’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या कॅम्पस निवड प्रक्रियेतून श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.


       ‘टेक महिंद्रा’ या कंपनीच्या निवड समितीने श्री विठ्ठल अभियांत्रिकी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून विठ्ठल अशोक शिरसाळे, रूपम रेवणनाथ मुळूक, वैष्णवी दिगंबर वाळके, वेदांगी मंगेश भुजंग, ऋषिकेश प्रसाद लोहार, भुषण सतीश देशमुख, राहुल लक्ष्मीकांत हिंगमिरे व स्वप्निल कांतीलाल उबाळे या आठ विद्यार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु. ३.५ लाख इतके पॅकेज मिळाले आहे.


 सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!