शेतकर्यासाठी लढणारा कुणीतरी हवा : खा.शेट्टी

स्वाभिमानीने शेतकऱ्यांसमोर दिला पर्याय

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे कोणी तरी हवे यासाठी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी चे तालुकाध्यक्ष सचिन अरुण शिंदे निवडणूक मैदानात उतरवले आहेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी.खा राजू शेट्टी यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या उमेदवारी साठी माजी खा. राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी पंढरीत तळ ठोकून आहेत. मतदारसंघ ढवळून काढला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सवाल करीत आहेत. थकीत एफआरपी च्या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक शांत आहेत. शेतकरी मात्र यामुळे अडचणीत आलेला आहे. त्याची नाराजी मतदानातून पुढे येवू शकते. त्यामुळेच राष्ट्रवादी तसेच भाजपाची मंडळी गल्ली – बोळात प्रचार करताना दिसते आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, जनसामान्यांचे प्रश्न घेऊन, प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. थेट जनसामान्यांमध्ये मिसळतात, त्यामुळे स्वाभिमानीचे उमेदवार सचिन शिंदे यांनी प्रचारात लक्षवेधी लढत उभा केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!