स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३९ गावे ओडीएफ प्लस


सिईओ दिलीप स्वामी यांचा पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते गौरव


सोलापूर : ईगल आय मीीडिया

. सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३९ गावे ओडीएफ प्लस करून राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेने चांगली सुरूवात केली आहे. सिईओ दिलीप स्वामी यांनी विविध विकास कामे व कोरोना काळात केलेले काम अतुलनीय आहे असे मत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण समारंभात सिईओ दिलीप स्वामी यांचा कृतज्ञता पुर्वक सत्कार करणेत आला या प्रसंगी ते बोलत होते.


या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण , अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन विभागाची सभापती अनिल मोटे, सहाय्यक जिल्हाधिकारी ओव्हाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी बाबर, जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते, जि सदस्या स्वाती कांबळे, हेमंत थोरात, शंभुराजे मोरे, उपस्थित होते.

या ग्रामपंचायतींना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देणे साठी आराखडा तयार करणेत येत आहे. या वर्षात ४२५ ग्रामपंचायती ओडिएफ प्लस करणेसाठी प्रयत्न करणेत आहे. नियोजन आमचे असले तरी गाव पातळींवर प्रभावी अंमलबजावणी साठी सरपंचानी प्रयत्न केले पाहिजेत. स्वच्छतेचे सातत्य लाखा असे आवाहन केले.

सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषद विशेष प्रयत्न करीत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोना च्या काळात उल्लेखनीय काम केले. त्यांनी राबविलेल्या माझं गाव कोरोना मुक्त गाव “ ही चळवळ बनली. शासनाने शासन निर्णय काढून ही योजना राज्यभरासाठी लागू केली. मुख्य मंत्री उध्दव ठाकरे यांनी या अभियानाचा विशेष गौरव केला. वेगवेगळी १६ अभियाने राबवून त्यांनी कोरोना जेवढे नियंत्रित ठेवतां येईल तेवढा प्रयत्न केला. त्यांचा गौरव होणे अपेक्षित होते तो झाला. काम केलेल्या माणसाच्या गौरव झालेस काम करणेस हुरूप येतो.

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना उप मुख्य कार्यकारी अघिकारी गोरख शेलार यांनी ओडिएफ प्लस गावाची तालुका निहाय माहिती दिली. अक्कलकोट – १, बार्शी -१ , करमाळा -४, माढा -१, माळशिरस १५ , मंगळवेढा- ५, मोहोळ ३, पंढरपूर -५, सांगोला -२ , उत्तर सोलापूर – १, दक्षिण सोलापूर १, या नुसार ३९ ग्रामपंचायती ओडिएफ प्लस झाले आहेत.

अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी शेटफळ ओडिएफ प्लस केले बद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते सत्कार करणेत आला. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!