मंदिरे कधी उघडणार ?

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत

टीम : ईगल आय मीडिया

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. पण, थिएटर, धार्मिक स्थळे याबाबत निर्णय झाला नाही. सध्या सणांचे दिवस आहेत. दसरा, दिवाळी तोंडावर असून कोरोनाबाधितांचे प्रमाण घटल्यास मंदिरे उघडण्याबाबत निर्णय शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यासाठी दिलेल्या अत्याधुनिक अशा दोन फिरत्या रुग्णालयांचे लोकार्पण  आरोग्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आले. नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी पुढे बोलताना ना.टोपे म्हणाले की, कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे बंदच राहतील. कोरोनाचे आकडे कमी झाले तर दसरा, दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे पुन्हा उघडली जाऊ शकतात, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हा निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करून घेतला जाईल. आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच याबाबत अधिकार आहेत, अशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!