हे आहेत नापास झालेले 0.05 टक्के विद्यार्थी

टीम : ईगल आय मीडिया

यंदा इयत्ता दहावीचा निकाल ९९.५ टक्के उत्तीर्ण झाले तर उरलेले ०.०५ टक्के अनुत्तीर्ण ठरवण्यात आलेले आहेत. ४९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून, त्यात ३६८ एटीकेटीचे विद्यार्थी, ९१६ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी वर्षभरात जे विद्यार्थी शाळांच्या संपर्कात नव्हते असेच एकूण १४०० विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. तर, ४९२२ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला असून, त्यात ३६८ एटीकेटीचे विद्यार्थी, ९१६ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या, तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत घेत निकालाबाबत सविस्तर माहिती दिली.


तसेच, एकूण ७२ विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये २७ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्याथ्र्यांपैकी ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ६ लाख ९८ हजार ८८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २१८०७० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ९३५६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

इयत्ता दहावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (१००%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९९.८४%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६% असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ % आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!