रंगपंचमी खेळल्यानंतर 3 मुलांचा मृत्यू

टीम : ईगल काय मीडिया

कोल्हापूर जिल्ह्यात दोन विविध घटनांत रंगपंचमी खेळल्यानंतर पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातीतल पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोडोली येथे शुभम पाथरवट आणि शिवराज साळुंखे या दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्युमुळे कोडोली गावावर शोककळा पसरली आहे. शुभम पाथरवट आणि शिवराज साळुंखेंच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील शिंगणापूर येथेही अशीच घटना घडली. यशराज माळी या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाला. बचाव पथकाला एका मुलाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन पथकानं त्या मुलाचा जीव वाचवला

Leave a Reply

error: Content is protected !!