पुलावरून चंद्रभागा नदीत पडल्याने 2 युवकांचा मृत्यू

मोटारसायकल पुलाच्या कठड्यास धडकली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गुरसाळे कडून पंढरपूर शहराकडे येत असलेले दोन मोटारसायकल स्वार शहरालगत असलेल्या अहिल्यादेवी पुलावरून चंद्रभागा नदीत पडल्याने मयत झाल्याची घटना आज ( दि.21 ) घडली आहे. विक्रम पितांबर खरात ( वय २५ वर्षे, रा. गुरसाळे ) आणि अनिल बापू चौगुले ( वय २५ वर्षे, रा. ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी, पंढरपुर ) मयतांची नावे आहेत.

अनिल चौगुले आणि विक्रम खरात दोघे मित्र होते, आणि ते दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल वरून गुरसाळे हुन पंढरपूर कडे येत होते. दरम्यान अहिल्यादेवी पुलावर आले असता पुलाच्या लोखंडी गार्ड ला धडकून नदीत पडले.

यावेळी पुलाजवळ असलेल्या सूरज राठी व इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र विक्रम खरात जागीच मयत झाला. जखमी अनिल चौगुले चा रुग्णालयात नेट असताना मृत्यू झाल्याचे समजते. विक्रम खरात याचा मागे आईवडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!