पंढरपूर : ईगल आय मीडिया
हवामान खात्याने पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्याने उजनी धरणातून आज सायंकाळी साडे सहा वाजता पाण्याचा विसर्ग 40 हजार क्यूसेक्स पर्यंत वाढवण्यात आला आहे. उजनीचा पाणी साठा सध्या 108.78 टक्के इतका आहे. त्यामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता पाणी सोडण्यात येत आहे
शनिवारी 20 हजार क्यूसेक्स केलेला विसर्ग आज दुपारी 30 हजार क्यूसेक्स होता. तर सायंकाळी यात आणखी वाढ करून साडे सहा वाजता 40 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे.
दौंड येथे 10 हजार तर बंड गार्डन येथे 7 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. शनिवारी बंद करण्यात आलेला वीर धरणातील विसर्ग आज दुपारी 4 हजार 311 क्यूसेक्स इतका करण्यात आलेला आहे.