उजनी विसर्ग 40 हजार

भीमा आज दुथडी वाहणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे आणि घोड धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढल्यामुळे शिवाय उजनी धरण पूर्ण 110 .14 टक्के पूर्ण झाल्याने आज ( रविवारी ) सायंकाळी 8 वाजता भीमा नदीला 40 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्या सकाळी 11 नंतर पंढरपूर तालुक्यातील भीमा दुथडी भरून वाहणार आहे, बहुतांश बंधारे पाण्याखाली जाणार आहेत.

शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून भीमा नदीला पाणी सोडण्यात होते.काल 8 वाजता यामध्ये वाढ करून 30 हजार क्यूसेक्स ने विसर्ग सुरू केला आहे. मात्र पुणे जिल्ह्यातून येणारा विसर्ग वाढल्याने रात्री 11 वाजता धरणातील विसर्ग 40 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे.

दरम्यान काल पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस कमी झाला आहे, मात्र घोड धरणातून पाणी सोडल्याने त्यामुळे दौंड येथील पाण्याचा प्रवाह 12 हजार 350 क्यूसेक्स आहे.

आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात 110. 14 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 40 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!