उजनी 108 टक्के : वीजनिर्मिती सुरू

1600 क्यूसेक्सचा विसर्ग सोडला : वीर चा विसर्ग वाढवला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरण 108 टक्केपेक्षा जास्त भरल्यानंतर धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. आज सकाळी 5 वाजता धरणातून 1600 क्यूसेक्स ने विसर्ग सोडून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली आहे. दरम्यान वीर धरणातील विसर्ग पहाटे 4 वाजता वाढवण्यात आलेला आहे.
उजनी धरण 108 पेक्षा अधिक भरलेले असताना अजूनही धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. सध्या धरणातून कालव्यात 2 हजार क्यूसेक्स, भीमा – सिना बोगदा 900 क्यूसेक्स ने पाणी सोडले जात आहे. त्याचवेळी दौंड येथे 9 हजार 800 क्यूसेक्स तर बंडगार्डन येथे येणारा विसर्ग 8 हजार क्यूसेक्स इतका आहे.त्यामुळे धरणातून भीमेला पाणी कधी सोडले जाते याकडे लक्ष लागले आहे.

वीर धरणाचा विसर्ग वाढवला

सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 400 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करुन आज पहाटे 4.00 वाजता 13911 Cusecs विसर्ग सुरु करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!