उजनीची वाटचाल नव्वदीकडे !


सकाळी ओलांडला 85 चा टप्पा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणातील पाणी साठा सकाळी 8 वाजता 85.80टक्के एवढा झाला असून धरणाच्या पाणी साठ्याची वाटचाल नव्वदीकडे सुरू झालेली आहे
दरम्यान पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे.त्यामुळे धरणाची वाटचाल संथगतीने सुरू आहे.


उजनी धरणात मंगळवारी सकाळी 85.80 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. त्यामुळे धरणाची वाटचाल आता 90 टक्केच्या दिशेने सुरू आहे. धरणात येणाऱ्या पााण्याचा बंडगार्डन येेेथील विसर्ग 12 हजार 401 क्यूसेक्स तर
दौंड विसर्ग 13 हजार 409 क्यूसेक्स आहे. पाण्याची आवक कमी झाल्याने धरणातील साठा संथगतीने वाढतो आहे.

वीर धरणातील विसर्ग पुन्हा वाढवला
वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सोमवारी संध्याकाळी 5 हजार क्यूसेक्स पर्यंत कमी केला होता. परंतु मंगळवारी सकाळी 7 वाजता तो वाढवून पुन्हा 13 हजार 911 क्यूसेक्स करण्यात आला आहे.
सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!