उजनी धरणाची शंभरी पार

12 धरणातून 40 हजार क्यूसेक्स विसर्ग येतोय

पंढरपूर : ईगल आय मीडिया

दीर्घ प्रतीक्षेनंतर 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता उजनी धरण 100 टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील 12 धरणातून सुमारे 42 हजार क्यूसेक्स चा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे 24 तासात धरणात सुमारे 6 टक्के पाणी वाढ झाली आहे. अजूनही पाणलोट क्षेत्रातील पाऊस सुरूच असून धरणात येणार विसर्ग कायम असल्याने दोन दिवसांत 110 टक्के भरण्याची अपेक्षा आहे.

12 धरणातून 42 हजार क्यूसेक्सचा विसर्ग वडज 409, डिंभे 4120, घोड 3100, कळमोडी 561, चासकमान 1850, आंध्रा 947,पवना 2160, कासारसाई 500, मुळशी 10300, वरसगाव 2665, पानशेत 3908, खडकवासला 11704 क्यूसेक्स या 12 धरणातून उजनीमध्ये पाण्याचा विसर्ग येतो आहे.


बंडगार्डन येथे उजनीत येणारा विसर्ग 22 हजार क्यूसेक्स तर दौंड येथे हाच विसर्ग 23 हजार 819 क्यूसेक्स आहे. त्यामुळे धरण आता 110 टक्के भरण्याकडे वाटचाल करीत आहे.
दरम्यान उजनी च्या दोन्ही कालव्यात पाणी सोडून ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागातील तळी, तलाव, ओढे, बंधारे, नाले भरून घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

वीर धरणातील विसर्ग 4 हजार 637 क्यूसेक्स

सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 600 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कपात करुन आज सकाळी 8.00 वाजता 4 हजार 637 Cusecs विसर्ग सुरु करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा ईशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!