उजनी 12 तासात 5 टक्के वाढ!

30 टक्केची पातळी ओलांडली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे जिल्ह्यातील धारणातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. आज सकाळी 6 धरणातील पाणी साठ्यात 25 टक्के पर्यंत वाढ झाली मात्र त्यानंतर 12 तासात 5 टक्के वाढ झाली असून धरणाने 30 टक्केची पातळी ओलांडली आहे.

दरम्यान, दौंडजवळ उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला असून तो 25 हजार 407 क्यूसेक्स इतका आहे. उजनी धरण गुरुवारी उणे पातळीत होते.मात्र मागील तीन दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने दोन दिवसात धरणातील पाणी साठ्यात सुमारे 20 टक्केहून अधिक वाढ झाली आहे.

काळ सायंकाळी 6 वाजता सायंकाळी 18.32 टक्के या पातळीवर धरण साठा होते. 12 तासात आणखी वाढ होऊन ते आज सकाळी 6 वाजता 25. 25 टक्के झाले होते. दिवसभरात 12 तासात आणखी 5. 30 टक्के ची वाढ होऊन धरणाने 30.54 टक्केची मजल गाठली होती. महिना अखेर उजनी 50 टक्केची पातळी गाठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने उजनीत येणाऱ्या विसर्गात 22 हजार क्यूसेक्स ची घट होऊन तो दौंड जवळ 25 हजार 407 क्यूसेक्स इतका विसर्ग येत आहे.तर बंडगार्डन येथे 14 हजार 545 क्यूसेक्स इतका विसर्ग कायम आहे. त्यामुळे उजनी येत्या आठवड्यात पन्नाशीच्या घरात जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!