उजनीतून भीमेला विसर्ग सुरू, विरचा मात्र बंद

भीमेला धरणातून 5 हजार क्यूसेक्सने पाणी सोडले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरण अगदी काठोकाठ म्हणजे 109 टक्के भरल्यानंतर धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान पाऊस बंद झाल्याने वीर मधून नीरा नदीला सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
उजनी धरण यंदा उशिरा 100 टक्के झाले आहे. ,बुधवारी रात्री 8 वाजता धरणाच्या 1, 8, 9 आणि 16 या 4 दरवाजातून 5 हजार क्यूसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
दोन्ही कालवे, बोगदा, उपसा सिंचन योजना, वीजनिर्मिती साठी ही पाणी सोडण्यात येत आहे. धरण 109 टक्के भरल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली असून यंदाच्या हंगामात 2 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

वीर धरणातील विसर्ग बंद

सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 400 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणारा विसर्ग सायंकाळी 6.00 वाजता बंद करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!