उजनी 33.17 टक्के ; तर वीर 100 टक्केच्या उंबरठ्यावर

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने उजनीत येणाऱ्या विसर्गात घट झाली आहे. तरीही रात्रीच्या 12 तासांत उजनीच्या पाणी साठ्याने 33.36 टक्केची मजल मारली आहे. दरम्यान, निरेच्या खोऱ्यातील वीर धरण 98 टक्के भरले असून धरणातील विसर्ग मध्यरात्री 1 वाजता 13 हजार 746 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी 6 वाजता धरणाने 30 टक्केची पातळी ओलांडली होती. दरम्यान, दौंडजवळ उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने धरणाच्या पाणी साठ्यात होणारी वाढ संथ झाली आहे. आज सकाळी त्यात 33. 36 टक्केची नोंद झाली आहे. दौंडजवळ येणारा विसर्ग कमी होऊन तो 17 हजार 996 क्यूसेक्स इतका सुरू आहे.

नीरा नदीच्या खोऱ्यात ही पाऊस थांबला असल्याने वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग रविवारी सकाळी कमी करण्यात आला होता. सायंकाळी 6 वाजता तो 5 हजार क्यूसेक्स वर होता मात्र मध्यरात्री 1 वाजता वाढवून 13 हजार 746 क्यूसेक्स करण्यात आला आहे. वीर धरण शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहे. सकाळी सहा वाजता धरण 97. 47, भाटघर 61.31, नीरा देवघर 88.19 तर गुंजवणी 86.66 टक्के भरले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!