वीर 23 हजार चा विसर्ग

उजनी पाणी साठा 68 टक्के वर

टीम : ईगल आय मीडिया

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असून वीर धरण 100 टक्के तर उजनी धरण सायंकाळी 6 वाजता 68. 48 टक्के भरले आहे. आज सायंकाळी विर धरणातून नीरा नदीला पाणी सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून सायंकाळी 5 गेट 4 फुटांनी उचलून 6 वाजता 23 हजार 185 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

संबंधित बातमी वाचा !

दरम्यान आज सायंकाळी 6 वाजता भीमा नदीच्या खोऱ्यातील 9 धरणांतून येणार विसर्ग कायम असून दौंड येथे 12 हजार 703 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू झालेला आहे.

वीर धरणाच्या सांडव्यातून आज दुपारी 5 वाजता 13 हजार 911 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला होता तर सायंकाळी 6 वाजता त्यात वाढ करून 23 हजार 185 क्यूसेक्स करण्यात आला आहे.


तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाने केले आहे. नीरा नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये अशा प्रकारे सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!