वीर सह भीमेच्या खोऱ्यातील 9 धरणांतून पाणी सोडले.

टीम : ईगल आय मीडिया

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आज दुपारी विर धरणातून नीरा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी 8 वाजता भीमा नदीच्या खोऱ्यातील 9 धरणांतून 14 हजार 545 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू झालेला आहे. दरम्यान, भीमेच्या खोऱ्यातील 9 धरणांतून विसर्ग सोडण्यास सुरुवात केल्याने भीमेच्या पाणी पातळीत ही वाढ होणार आहे.

संबंधित बातमी वाचा !

वीर धरणाच्या सांडव्यातून आज दुपारी 2.00 वाजता 4637 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाने केले आहे. नीरा नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये अशा प्रकारे सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर भीमा नदीच्या खोऱ्यातील खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना, आंध्रा, चासकमान, कळमोडी, वडज या 9 धरणांतून 14 हजार 545 क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळेच भीमा नदीचा विसर्ग वाढून उजनीच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!