टीम : ईगल आय मीडिया
सातारा जिल्ह्यातील रेंगडेवाडी ( ता.जावळी ) येथे एकाच कुटुंबातील चौघे जण वेण्णा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. रात्री उशिरापर्यंत यापैकी कुणाचाही शोध लागू शकलेला नाही. दरम्यान, एका महिलेला वाचवण्यात मात्र यश आले आहे.
सातारा जिल्ह्यातही पावसामुळे हाहाकार उडाला असून अनेक नद्यांना पूर आला आहे. जावळीतील रेंगडेवाडी येथे दोन महिला आणि दोन पुरुष ओढा पार करत असताना पुरात वाहून गेले आहेत. वेण्णा नदीपात्रात त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
१. सहदेव गणपत कासुर्डे (६०) २. भागाबाई सहदेव कासुर्डे (५०) ३. तानाबाई किसन कासुर्डे (५०) आणि ४. रविंद्र सहदेव कासुर्डे (३०) हे चौघेजण पुरात वाहून गेले आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी पोळ यांनी दिली.
रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. शोधमोहीम रात्रीही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जावळी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आणि तहसीलदार राजेंद्र पोळ तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.