वाखरीत 75 घरात पुराचे पाणी : अतिवृष्टीमुळे 7 घरांच्या भिंती पडल्या

पंढरपूर : ईगल आय मीडिया

नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराचा फटका वाखरीतील नागरिकांनाही बसला असून पंचनामे सुरू केले आहेत. त्यानुसार 75 घरात पुराचे पाणी गेल्याचे आणि अतिवृष्टी झाल्याने 7 घरांचे भिंती पडूननुकसान झाल्याचे समोर आले आहे.

मागील आठवड्यात वाखरी परिसरात दोन दिवस जोरदार अतिवृष्टी झाली. तर सातत्याने पाऊस सुरू असल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याच दरम्यान भीमा नदीला आलेल्या महापुराने वाखरी गावात शिरकाव केला होता.

गावातील सखल भागातील 75 घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन प्रापंचिक वस्तूंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे तसेच 7 घरांच्या भिंती अतिवृष्टीमुळे पडल्या आहेत.

ग्रामसेवक मच्छिंद्र जाधव, तलाठी समाधान शिंदे, पोलिस पाटील बाळासाहेब शेंडे ग्रामपंचायत कर्मचारी नाना पोरे, बंडू कारंडे यांनी पंचनामे करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!