ज्या दिवशी छत अंगावर पडेल, त्या दिवशी बघू !

माझी ईच्छा आहे, धर्मयुद्ध टळावं : नाराज पंकजा मुंढे यांनी खंत बोलून दाखवली

टीम : ईगल आय मिडिया

आपल्या जीवनातील स्पिरीट असंच ठेवा. मी न बोलताही तुम्हाला कळलं. तुमचंही मला कळलेलं नाही. तुमच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. ऊसाच्या फडात काम करणाऱ्या माणसाला सभापती बनवलेलं आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या मंत्रिपदापेक्षा मला हे महत्त्वाचं आहे. गरीब माणूस बाजार समितीचा सभापती असल्याचा मला अभिमान वाटतो. वंचितांचा वाली बनण्याचं आपलं स्वप्न आहे. इथे आता राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल, त्यादिवशी बघू”, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी , माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. त्यामुळे आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत”, असा सबुरीचा सल्ला समर्थकांना दिला.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून खा. प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी यावर नाराजी व्यक्त करीत बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. दरम्यान रविवारी पंकजा मुंढे यांनी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला ही हजेरी लावली. त्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मुंढे यांना कानपिचक्या दिल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर आज मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला असला तरी मनातील राग ही व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यातील काही नेत्यांची नावे घेतली असली तरी नाव न घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका ही केली आहे.

नामोल्लेख टाळून फडणवीसांवर टीका

कौरव आणि पांडवातील युद्ध पांडवांनी जिंकण्याचं आणखी एक कारण होतं. कौरवांच्या सैन्यातील लोक मनाने पांडवांसोबत होते आणि शरीराने कौरवांसोबत होते. कळलं का तुम्हाला. त्यांच्या रथावर असलेले सारथीसुद्धा त्यांच्यासोबत नसतील. काळ कधीच थांबत नसतो. तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा. मला काय मिळालं नाही, अशा चिल्लर लढाईत मला पडायचं नाही. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठीच इथे उभे आहोत. तुम्ही सगळे माझे महारथी आहात. काही लोकांनी असं भाष्य केलं की, पक्षाने दिलेलं विसरणार नाही. नेत्यांचे कान भरून मोठं होणारी मी नाही. चंद्रकांत पाटील महसूलमंत्री झाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. आशिष शेलारांनीही चांगलं वक्तव्य केलं. मला आई आणि बाप अशा दोन्ही भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात”, अशी भूमिका पंकजा यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.

यावेळी पुढे बोलताना मुंढे यांनी, माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाह, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत. असे बोलून दाखवले. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. मला माझ्यासाठी काही नकोय. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपाने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणं शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचं नाव आलं, काय बिघडलं? असं पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या.

“निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी कुणाला भीत नाही, पण मी आदरही करते. मी माझ्यापेक्षा वयाने मोठं असणाऱ्या व्यक्तींचा अनादर केला नाही. कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत, धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. मी सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मात्र मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

Leave a Reply

error: Content is protected !!