ओव्हल कसोटीत शानदार विजय

157 धावांनी इंग्लंड वर मात

 टीम : ईगल आय मीडिया

इंग्लंड विरुद्ध ओव्हल च्या मैदानावर पाचव्या आणि निर्णायक दिवशी भारताच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. त्यामुळेच भारताला मोठा विजय साकारता आला.आणि चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडला धूळ चारत दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीपासून भारताने इंग्लंडच्या फलंदाजांना ठराविक फरकाने बाद करण्याचा सपाटा लावला. इंग्लंडचा रॉरी बर्न्स (५०) हा पहिला शिकार ठरला. त्यानंतर भारतीय संघाने डेव्हिड मलानला धावचीत करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. त्यानंतर जडेजानेच हसीबला बाद करत भारताला मोठा यश मिळवून दिले. हसीबने सहा चौकारांच्या जोरावर ६३ धावा केल्या. हसीब बाद झाल्यावर ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि मोइन अली हे लवकर बाद झाले. भारताने यावेळी सहा धावांत चार फलंदाजांना बाद केल्यामुळे संघाच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या.

ओव्हल कसोटीचा सारांश !

भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपवला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलं नाही. इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.

भारताच्या विजयाच्या मार्गात यावेळी सर्वात मोठा अडसर होता तो इंग्लंडचा कर्णधार जो रुट. कारण यापूर्वी झालेल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये रुटने शतक झळकावले होते. पण शार्दुल ठाकूरने यावेळी रुटला बाद करत भारताच्या विजयाच्या मार्गातील विजयाचा मोठा अडसर दूर केला. त्यामुळे भारतीय संघ यावेळी विजयासमीप आला होता. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ख्रिस वोक्सला १८ धावांवर बाद केला आणि भारतीय संघ लवकरच विजय मिळवेल, अशी आशा निर्माण झाली होती.

या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. कारण पहिल्या डावातही वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा केला होता, त्याचबरोबर दुसऱ्या डावातही उमेश यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा आणइ मोहम्मद सिराज यांनी भन्नाट कामगिरी केली. या चौघांना यावेळी रवींद्र जडेजाचीही चांगली साथ मिळाली. शार्दुल ठाकूरने तर या सामन्यातील दोन्ही डावांत अर्धशतकं झळकावली

Leave a Reply

error: Content is protected !!