भारताला कुस्तीमध्ये रौप्य पदक

पैलवान रवी कुमारचा अंतिम फेरीत संघर्षपूर्ण पराभव

टीम : ईगल आय मीडिया

दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जावूर युगुयेवला कडवी झुंज देणाऱ्या रवी कुमार दहिया चे सुवर्णपदक 3 गुणांनी हुकले आहे.तरीही त्याने रौप्यपदक पटकावून भारताच्या खात्यात 5व्या आणि या ऑलिम्पिकमध्ये एकूण दुसऱ्या रौप्य पदकावर नाव कोरले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आणखी एक पदक खिशात घातलं आहे. भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने 57 किलो वजनी गटात रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. रवीचा थोडक्यात पराभव झाला असून दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या जावूर युगुयेवने सुवर्णपदक मारलं आहे.


भारताचा पैलवान रवी कुमार दहिया अगदी स्वप्नवत कामगिरी करत ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता.

अंतिम फेरीत त्याची गाठ दोन वेळच्या विश्वविजेत्या मल्लाशी पडली, तरीही रवी कुमारने कडवी लढत देऊन लक्षवेधी कामगिरी केली. त्याची यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहता तो भारतास सुवर्णपदक मिळवून देईल असे वाटत होते आणि त्याने अंतिम सामन्यात खेळही तसाच केला. मात्र चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर 7-4 ने त्याच्या हातातून सुवर्णपदक निसटलं

यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी चांगली ठरत आहे. भारताने आतापर्यंत 5 पदकं मिळवली असून आणखी काही भारताचे महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. पाच पैकी दोन रौप्य तर तीन कांस्य पदकं आहेत.

यात सर्वांत आधी वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूने रौैप्यपदक, त्यानंतर पीव्ही सिंधूने टेनिसमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं. ज्यानंतर बुधवारी लवलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्य तर आज सकाळी हॉकी पुरुष संघाने कांस्य पदक मिळवून देत भारतासाठी पदकांचा चौकार मारला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!