पंढरपूर : ईगल आय मीडिया
मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. यामुळे विविध बँका आणि महिला बचत गटांचे कर्जाचे हप्ते थकीत झाले होते.सध्या अजूनही अनेक व्यवसाय सुरू नसल्याने अजूनही काही महिने ही वसुली थांबवावी अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
बचत गटाची रक्कम मिळताना विमा रक्कम म्हणून काही पैसे काढून घेतले जातात ,त्यामुळे या कोरोनाच्या वाईट परिस्थितीत तो विमा लागू करून महिलांचे कर्ज जमा करून त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देऊन ही महिला बचत गटाची चळवळ सुरू ठेवावी अशी मागणी मनसेने लावून धरली आहे.
याबाबत मनसेचे दिलीप धोत्रे यांनी मागील चार महिन्यापासून अडचणीत आलेल्या या बचत गटाच्या महिलाना सवलत देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे, त्यामुळे अनेक महिला बचत गटांच्या महिलानी आभार मानले आहेत.
या विषयी दिलीप धोत्रे यांनी सम्पूर्ण राज्यातील महिलांना दिलासादायक असल्याने थेट बचत गट वसुली बाबतीत होणारा महिलांना जो त्रास आहे तो राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहचविले आहे. त्यामुळे लवकरच राज ठाकरे याबाबत निर्णय घेऊन याबाबतीत आवाज उठवून महिलांना दिलासा मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.